Wednesday, June 5, 2013

खिंडीच्या पलीकडे बंदिस्त स्वरांची दरी

खिंडीच्या पलीकडे

ही होती बंदिस्त स्वरांची दरी ढगांच्या दरीतले स्वर तुझ्या त्या फांदीवरच्या पक्ष्याप्रमाणे होते - उन्युक्त, स्वच्छंदी कानावर पडल्या पडल्या तुम्हाला त्याच्या बद्दल सर्व कळायच - समजत नसल तरी. अगदी थेट पक्ष्याच्या गाण्यासारखच. ते गाण पण पक्ष्या - सारखच उन्मुक्त असत की नाही ! तसेच ढगांच्या दरीतले स्वर पण होते. मला वाटत की पक्षी पण ढगांच्या दरीतूनच येत असावेत.
    ढगांच्या दीतले उन्मुक्त स्वर तुम्हाला समजत नाहीत. त्यामुहे गैरसमजही होत नाहीत. तुम्हीही त्यांच्याशी कुठला भावबंद जुळवायचा प्रयत्न करीत नाही कारण तुम्हाला त्यांचं उन्मुक्त - असण माहीत असत. ते त्यांच्या लयीने जात असतात. वाटेत तुम्ही भेटलात तर हलकासा स्पर्श - करुन पुढे होतात. ते कानांत क्षण दोन क्षण मंजुळ विनादत रहातात तोपर्यंत दुसरे स्वर तुमच्यापर्यंत येऊन ठेपतात - मग तुम्ही त्यांची मजा करण्यांत गुंगून जाता.
    स्वच्छंदी स्वर कायम ढगांच्या दरीतच रहातात. निधल्या लहान माठया सर्व प्रवाशांच्या ओळखीचे होतात. पण त्यांना बंदिस्त स्वरांच्या दरीत यायला आवडत नाही. प्रवासी या दरीत येतात तेंव्हा त्यांना इथे एक विचित्र वस्तु दिसते खर तर प्रवाशांनी हिच्याकडे दुर्लक्ष केल असत आणि तसेच पुढे गेले असते तर भागच्या दरीसारखे इथेही स्वर उन्मुक्तच राहिले असते.
    पण तस होत नाही. गांत कांही लोकांना नुसत माहित असून पुरत नाही - त्यांना समजून घ्यायच असत नव्हे, ते त्यांना अत्यावश्यक वाटत मग असा एखादा माणूस येतो तो त्याच्या लांब नाकाने वास घेत घेत प्रत्येक वस्तु हुडकतो प्रवासात पुढे जाण्याऐवजी ही विचित्र वस्तु समजून घेण्यासाठी कितीही वेळ द्यायची त्याची तयारी असते. म्हणून तो थांबतो आणि या भ्रमविणा-या तस्तुकडे लक्ष देतो.
    आणि त्याला समजत की हा सापळा आहे - उन्मुक्त स्वरांना बंदी बनवण्याचा सापळा. यात अडकले की त्यांना पूर्वीसारख स्वच्छंदी वावरता येणार नसत. या लांबनाक्या प्रवाशाला सापळा भारी आवडतो. तो सापळा हातात घेऊन सापडतील त्या स्वरांना कैद करत सुटता. दरीतले जवळ जवळ सगळे स्वर तो अडकवतो. स्वर खूप दुःखी झालेले असतात. स्वच्छंदी वावरणं हेच त्यांच जीवन असतं सापळयांत अडकून ते निर्जीव, निक्षैतन्य होतात, जणू कांही निर्जीव सांगाडया सारखे. ते रापुडवाणे मलूल होऊन पिंज-यात पडून रहातात. मग हा लांबनाक्या प्रवासी त्यांना एकेक करुन ओवतो - भाळेत फुळं ओवावीत तशी असे ओवलेले स्वर डबांबंद करता येतात उलट - सुलट फिरवता येतात, नष्टही करता येतात. ते इतरांवर फेकून मारता येतात आणि त्यांना हमखास इजा करु शकतात. त्यांना एखाद्या छानशा वेष्टनात गुंडाळून अहेर म्हणूनही देता येते. लांबनाक्या प्रवाशाने विचार केला तसे त्याला सुचले की हजारो प्रकारांनी हे बदिस्त सूर वापरता येतील.
    मग त्याने पंचाचे कपडे चढवले आणि दरीच्या तोंडाशी जाऊन बसला. दरीत येणा-या प्रत्येक प्रवाशाला तो एकेक सापळा देऊन त्यांत स्वर कसे अडकवायचे ते सांगू लागला. तो म्हणाला हे ही एक कर्मकांड आहे आणि सगळयांनी ते प्रवासभर निभावलच पाहिजे. प्रवासभर त्यांनी 'पकडा आण ओना' हा खेळ खेळलाच पाहिजे. त्याने पंचाचे कपडे घातले हाते त्यामुळे इतर प्रवाशांना त्याची भिती वाटली. तो म्हणाला ते सर्वांनी कबूल केल. अशा त-हेने या दरीत आणि पुढचा प्रवासभर सगळे स्वर बंदिस्तच राहिले.
    हे सगळ मला त्या ज्ञानी माणसाने सांगितल. हे जस जस घडल तस्साच्या तस्स त्याला माहित होत. पण त्या लांबनाक्या प्रवाशाने असं कां केल हे मात्र त्याला समजल नाही. जर त्याने समजून घ्याव म्हटल असत तर त्याला नक्की समजल असत. पण बहुधा त्याला माहित असाव की हे जर त्याला समजल तर तो पण स्वरांचा शिकारी होईल. हे त्याला आवडल नसणार. म्हणून त्याने कधीच समजून घ्यायचा विचार मनांत येऊन दिला नाही. तुझ्या लक्षांत आल कां? या दरीत सुध्दा विचारांचा पर्याय त्याने स्वतःकडेच ठेवलाऋ आपल्याला पण ठेवता येतो.
    स्वर उन्‌ुक्त असतात तेंव्हा आपल्याला हलकेच स्पर्श करुन निघून जातात. दुस-या क्षणी तुम्हीं एखादा नवा स्वर ऐकत असता. पण एकदा का स्वराला बंदिस्त केल की संपूर्ण प्रवासात तो सतत तुमच्या कानात धुमत रहातो. अगदी शेवटची खिंड येईपर्यंत - किंवा कदाचित तिच्या पलकडेही.
    स्वर कानात घुमत राहिले की ते तुमच्या विचारांची जागा अडवतात.
    स्वर नसतील त्याच जागेच विचार जन्माला येऊ शकतो. ढगांच्या दरीत उन्मुक्त स्वर यायचे आणि क्षणभरांत विसरुन जायचे. त्यामुळे नवे विचार जन्माला येण्यासाठी खूप जागा असायची ते पंचांना नको असायच त्यांना हव असत की तुमचे विचार कर्मकांडात विरुन जावेत आणि तुमच्याकडे विचार करण्याचा पर्याय शिल्लक राहू नसे. मला तरी अस वाटत की ते स्वरांचे शिकारी असेच आले नाहीत - ते सुध्दा पंच मंडळींनी ठरवून आणले असावेत.
    बंदिस्त स्वर उडून जाऊ शकत नाहीत एकदा का ते विचारांच्या जागेत घुसले की तिथेच ठिच्या मांडून बसणार अशा त-हेने बंदिस्त स्वरांच्या दरीतून जातांना तुमच्या विचारांची जागा हळूहळू कमी होत जाते. मग अजिबात जागा उतर नाही. मग पुढच्या प्रवासभर तुम्ही 'विचारशून्य काम'हा खेळ खेळू शकता.
    बंदिस्त स्वरांचं सगळच संपून गेलेल असतं त्यांचा आकार, त्यांचा परिणाम, त्यांच उन्मुक्त विहरणं ! हळूहळू तही सापळण्याच्या आकाराचे होतात. सापळयांचा आकार पण स्थळा - काळाप्रमाणे बदलत असतो तसाच स्वरांचा आकार पण बदलतो काहीच त्या पक्ष्याच्या गाण्यासारख उरत नाही उन्मुक्त स्वरांना सापळा नसतो म्हणून बंदिस्त आकार पण नसतो. म्हणून ते आपल्याला स्पर्श करुन गेले की आपल्याला कळतात - समजले नाहीत तरीही.
    बंदिस्त, ओवलेल्या स्वरांच्या आकार कुणालाही सांगता येणार नाही. आपण फक्त ते बंदिवान स्वर बघायचे सापळा बघायचा आणि म्हणायच की हा सापळयाचा आकार म्हणजेच त्या स्वरांचा आकार. पण ते कांही खर नाही खरं हेच की बंदिस्त स्वर निर्जीव खोळीसारखे असतात. पंच सांगतात की हेच खरे स्वर आणि हाच त्यांचा खरा आकार. आपण ते मान्य करतो कारण आपल्या विचारांची जागा बंदिस्त स्वरांनी भरुन गेल्या मुळे आपल्याला 'विचारशून्य कामांचा' खेळ खेळण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यासाठी आपल्याला कर्मकांडं हवी असतात - ती पंच पुरवत असतात. म्हणून पंच सांगतील ते आपण मान्य करतो.
    'पण एकाही स्वराला पकडता आणि ओवता आपण या दरीतून जाऊच शकत नाही कां? तस केल तर आपल्या जवळपास कांही मुक्त स्वरही शिल्लक रहातील आणि विचारही शिल्लक रहातील.'
    'तुला जर विचार करण्याच स्वातंत्र्य हवच असेल तर एकच उपाय आहे - पंचांपासून लांब रहाणे' - अस म्हणत म्हातारा बाब उठला, आणि चालू लागला. एकदा का त्याने जायच ठरवल की तो अगदी एखाद्या छोटयाशा प्रश्नाच उत्तर द्यायला पण यांबत नसे !

-------------------ज््र------------------पुढील ब्लॉग पान पहा

खिंडीच्या पलीकडे उन्हाळी शिबिरांपासून पुढे

खिंडीच्या पलीकडे

तो खूप दिवस आला नाही मी एका उन्हाळी शिबिरांत भर्ती झालो होतो. तिथसे चालक आग्रही किंवा कडक शिस्तीचे नव्हते. आम्हाला खूप कांही करता येत असे. सकाळी व्यायाम करता यायचा, किंवा स्मरणशक्ती वाढवायच्या वर्गात जाता यायच, किंवा लांब फिरायला, किंवा डोंगरात भटकून मोराचे पंख आणि सापाची कान शोधता यायची. मला सापाची कात शोधायला आवडायची. एखाद्या गुप्तहेरा प्रमाणे मी तिथल्या तिथे फिरुन फिरुन सापाचा माग काढत असे. सकाळच्या वेळी डोंगरावर वर्दळ होण्यापूर्वी - गेल तर रात्री बसलेल्या पातळशा धुळीच्या आवरणांतून साप गेल्याची रेघ स्पष्ट दिसायची कांही दिवसांनी मी रेघेच्या ठळक पणावरुन सापाची जाडी ओळखायला शिकलो मी एक दिवस एका रस्त्याच्या मागावर जायचो - दुस-या दिवशी दुस-या.  काही वेळा साप
गवतातून गेलेला असायचा. तरी पण दवबिंदूंवर साप गेल्याची रेद्य ओळखू येत असे. पण दिवस चढला की ती रेघ विरुन जायची मग मी पुनःगोल गोल भटकायचो आणिसाप गेलेला रस्ता शोधून काढायचो किंवा शिबिरांत परत जायची वेळ झालेली असायची.
    शिबिरात परत गेल की नत्यासाठी खूप गोष्टी असायचा. वर्गर पण असायचा आधी सगळी जण फक्त वर्गर खायची हळू हळू आम्ही इतर पदार्थही आवडीने खायला शिकलो.
    मोरपंखांची आपली गंमत असते काही पंखांचा डोळा पूर्ण झालेला असतो. त्यांच्यावर झळझळणारा निहा रंग असतो. कांहीच्या वरची बाजू चंद्रकोरीच्या आकाराची असते आणि डोळा अपूर्णच असतो. कांही परंतु एवढे निस्तेज रंगांचे असतात की ते मोराचे पंख वाटतच नाहीत. खरतर, ते त्याच्या पिसा-याचे पंख नसतातच मुळी ते त्याच्या छोटया - छोटया - उडायच्या पंखांपैकी असतात काही अगदी इवलू - इवलूसे पण पूर्ण पंख असतात - छोटेसे निळे - निळे डोळे असलेले कांही पिस अगदी बारकुली - निळया रंगाची असतात ती मोराच्या मानेजवळची असतात ओली केली की त्यांचा रंग हिरवा होतो कोरडी झाली की पुनःनिळा होतो.
    पण कुठल्याही पंखाची शान सापाच्या कातेची बरोबरी करुन शकत नाही सगळया अंगांनी सापासारखीच वाटणारी, झळाळणारी, साप कुठून बाहेर पडला असेल असा विचार करायला लावणारी ! म्हातारा बाबा असता तर म्हणाला असता - बघ बघ, हाच तो चैतन्यशून्य आकार अशी ही प्राण नसलेली कान हातात घरली की केविलवाणी लोळागोळा होऊन जायची तरी पण विच्यात अद्भुत आकर्षण होत. डोळयांच्या खाचाच असायच्या, पण अंगावरचे खवले मात्र उठावदार होते मी हातात घेऊन डोळे मिटले की त्यात चैतन्य सळसळू लागायच हळूहळू साप फणा काढून उठून बसायचा आणि माझ्याकडे टक लावून बघायचा. अर्थात्‌ डोळे मिटलेले असले की सापाच्या फण्याची किंवा टक लावून बघण्याची भिती नाही वाटत.
    उन्हाळी शिबीराचे असे मंत्र भारले दिवस टचकन्‌ संपूरही गेले.
------------------ज््र----------------
    शळा उघडली आणि नेहमीच वेळापत्रक सुरु झाल मी पुनः एकदा दर रविवारी म्हाता-या बाबाच्या येणाचा कानोसा घेऊ लागलो. आणि एक दिवस अगदी अस्पष्टसा तो खट्-खट्-ठक्‌- चा आवाज कानांवर येऊ ठेपला तो येत असे त्या वळणाच्या दिशेने मी पळत गेलो. तिथे नेहमीची गर्दी होती. पण म्हातारा बाबा नव्हता तो चिरपरिचित आवाजही जवळ येत नव्हता. मी एकदम भांबावलो तेवढयांत खट्-खट् आवाज ऐकून मी वळालो, आणि शल्लीच्या दुस-या टोकाकडून तो येतांना दिसला नेहमी यायचा, त्याच्या विरुध्द दिशेकडून त्याच्या परतीच्या दिशेकडून - मी असा सुसाट धावत गेलो की त्याला जवळ जवळ घडकलोच. 'तू कुठे होतास इतके दिवस? मागण्च्या महिन्यांत पण आला होतोस कां? तेंव्हा मी उन्हाळी शिबिरासाठी गेलो होतो. आणि तू शाळेच्या दिवसांत आला होतास कां? आता मी नेमाने शाळेत जायला लागलोय्‌. तुला बर वाटत नाही कां? तू असा आजारी कां दिसतोस?' माझे प्रश्न संपत नव्हते, पण मला धाप लागली होती.
    त्याने दृष्टि वळवली आणि डोळा भरुन माझ्याकडे पाहिल. 'मी प्रवासात होतो.' तो म्हाणाला.
----------------ज््र---------------
    'या वेळी मी एका कठिण खो-यांत होतो. त्याबद्दल नंतर सांगेन मागे आपण बोललो तेंव्हा मी तुला ढगांच्या दरीबद्दल सांगत होतो. पण त्यांत आता सांगायसारख फारस उरल नाही दरीचा प्रवास पुढे पुढे कठिण होत जातो. आधीच्या प्रवासात आपण सुखाने फिरतो. जणू कांही ढगांबरोबर तरंगतच पण आता अधून मधून हाता-पायांवर सरपटत जाव लागतं ! पाऊल वाटा अरुंद होत जातात, आणि तिथे खूप कांही कांही असत. विचित्र प्राणी असतात, मैत्री करणारे पक्षी असतात. आधीचे भिजवणारे आणि उजेडाची तिरिप टाकणारे ढग इथे पण असतात पण आता ते नुसता वैताग नाही आणत ते इतके जवळ येतात आणि इतके रागीट दिसतात म्हणून सांगू ! वाटत, ते सांगताहेत
- आमचा कर्मकांडांचा खेळ खेळ नाहीतर तुझी काळजी घेणार नाही. अर्थात्‌ त्यांच 'काळजी घेण' कांही आपल्याला आवश्यक नसत तरी पण अशा धमक्या केंव्हाही वाईटच मग आपल्याला सवंगडी ढग आठवतात. दरीच्या सुरवातीला ते किती दारीवाटीने आपल्या बरोबर असायचे. पण इथे ते नसतात आपल्याला वाटत - मागे नावं आणि त्यांच्यात खेळावं पण कळत की मागे जाता येणार नाही. या प्रवासात मागे जाता येत नाही.
    आणि तेंव्हा कुठे लक्षांत येत की आपण एक खिंड ओलांडून दुस-या दरीत आलो आहोत.
---------------------------पुढील ब्लॉग पान पहा